संजीवनी परिवारातर्फे महिलासाठी ‘आरोग्यं धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व डॉ. उषा देसाई (विरार) उपस्थित होते. डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला आलेल्या बाळाच्या काळजी पासून ते स्त्रियांच्या जीवनातील वेगवेगळ्या स्थित्यंतरं, त्यात घ्यावयाची काळजी, वयात येणा-या मुलींचा आहार, त्यांच्यात निर्माण करावयाची सहनशीलता याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. उषा देसाई यांनी स्त्रियांची प्राथमिक आजाराविषयी माहिती देताना हिमोग्लोबिन व कॅल्शियम संतुलन याचे महत्व समजावून सांगुन त्यासाठी घ्यावयाचा आहार या विषयी माहिती दिली. मुलींच्या शारीरिक बदलाबरोबरच मानसिक अवस्था कुटुंबियांनी जाणून काळजी घ्यायला हवी, असे त्या म्हणाल्या.