वक्तृत्व स्पर्धा २०१७

विषयावर सखोल वाचन करावे, त्यावरील उत्तम व्याख्याने, विचार ऐकावेत.
विषयावर सखोल वाचन करावे, त्यावरील उत्तम व्याख्याने, विचार ऐकावेतव संजीवनी नी निर्माण केलेल्या व्यासपीठाचा पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रतिपादन परीक्षक महादेव इरकर यांनी संजीवनी वक्तृत्व स्पर्धेत केलं.
संजीवनी वक्तृत्व स्पर्धेचं हे सहावे वर्ष. स्पर्धा चार गटात घेण्यात आली पहिला गट ५ वी ते ७ वी ,दुसरा गट ८ वी ते १० वी तिसरा गट ११ वी व १२ वी चौथा गट १२वी पुढील विद्यार्थी.
प्रत्येक गटाला दोन दोन विषय देण्यात आले होते व ऐच्छिक विषयाचा पर्याय ठेवण्यात आला होतो. पहिल्या गटाला १) एक झाड लावू या !! २) माझा आवडता छंद. दुस-या गटाला १) गणेशोत्सव बदलते स्वरूप. २) पाणी वाचवा जीवन जगवा. तिसरा गट १) मोबाईल गरज की व्यसन ! २) भारतातील स्त्रीयांचे स्थान. चौथा गट १) सामवेदी बोली भाषा २) अर्थसाक्षरता काळाची गरज. असे विषय ठेवण्यात आले होते.
स्पर्धेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूण ९० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. गट निहाय उपस्थिती, गट क्रमांक १ – ३१,गट क्रमांक २ – ३९,गट क्रमांक ३ – ०८ ,गट क्रमांक ४ – १२ एकुण – ९०

किशोर वझे यांनी प्रास्ताविकात संजीवनीच्या उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली व वक्तृत्व स्पर्धेमागील भूमिका मांडली. आनंद पाटील यांनी सुत्रसंचलन व सर्वांचे आभार मानताना पदमश्री भाऊसाहेव वर्तक विद्यामंदिर नाळे यांचा विशेष उल्लेख केला व परीक्षकांना धन्यवाद दिले. परीक्षक म्हणून तृप्ती राऊत,,वैशाली राऊत,पल्लवी चौधरी, महादेव इरकर ,निरा नाईक, गीता नाईक ,रूपाली नाईक व कल्पना नाईक यांनी काम पाहिलं.स्पर्धा परीक्षक व वकृत्व स्पर्धा आयोजनात सौ. भक्ती वर्तक यांनी खुप मेहनत घेतली.
vaktrutva3vaktrutva4

vaktrutva2vaktrutva1