
झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला गेलो, असं श्री सायनेकर सरांनी संजीवनी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण संतुलन साधण्यासाठी झाडं लावतात किंवा सौदर्याच्या दृष्टीकोनातून. ” झाडं लावणे व त्याचं संवर्धन करणे” या मध्ये माझी व संजीवनीची एक वेगळी भावना आहे, ती म्हणजे वृक्षाप्रती कृतज्ञतेची भावना. झाडापासून खूप शिकण्यासारखे आहे. झाडं बहरतात कशी,प्रतिकूल परिस्थितीत वाढतात कशी. झाडावर जो घाव घालतो त्याला ही झाडं सावली देतात , त्यांला फळं देतात हे सगळं त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या आईवडीलांचं विशेषता वृद्धापकाळात ज्या प्रेमाने, आदराने संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे झाडांच्या बाबतीत आपलं कर्तव्य आहे. झाडांची आणि मुलांची एकप्रकारे तुलना करता येईल लहान रोपाची योग्य काळजी घेतल्यानंतर जसं वृक्षात रुपांतर होतं , तसं संस्कारक्षम मुलांची काळजी आईवडील व समाजाने घ्यायला हवी.
इयत्ता | ९० % वरील | ८० ते ८९.९९% | ७० ते ७९.९९% | ६० ते ६९.९९% | ६०% खालील | एकूण |
१०वी | १४ | ३४ | २१ | २० | १४ | १०३ |
१२वी | ७ | १४ | ३३ | ३७ | ९१ |



बारावीतील प्रथम तीन विद्यार्थी


सुरवातीला अरविंद पाटील यांनी वृक्ष वाढदिवस व विद्यार्थी स्नेहसंमेलनविषयी संजीवनीची भूमिका मांडली. आनंद पाटील यांनी सुत्रसंचलन व आभार प्रकट केले.