मंथन कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी कोर टीम बनवण्यात आली.
शैक्षणिक कार्यक्रमा विषयी चर्चा करताना आलेले काही मुद्दे पुढील प्रमाणे : –
समाजातील विध्यार्थ्यासाठी एक व्यासपीठ असावे, विध्यार्थ्याना आपले यश , अनुभव इतर विध्यार्थ्याना सांगावयाची (Knowledge sharing) संधी मिळावी,वर्षातून कामित कमी दोन ते तीन मेळाव्याचं आयोजन करण्यात यावं सद्या विद्यार्थाचही ग्लोबलायझेशन होत आहे. वेगवेगळे अभ्यासक्रम,स्पर्धापरीक्षा यात निभाव लागण्यासाठी विध्यार्थानी काही गुणांची कास धरायला हवी.
आपल्या मधील ‘स्व’ची ओळख असवयाला हवी, म्हणजेच self awareness. मला काय आवडते, कोणत्या विषयात गती आहे,कोणत्या विषयावर लक्ष केन्द्रित करायला हव ही जाणयावी.
एखाद्या समस्याची उकल म्हणजे (Problem solving Skill)तो प्रश्न कसा सोडवावा,काय पर्याय उपलब्ध आहेत याची जाणीव वाढवणे
निर्णयक्षमता (Decision making) पटकन निर्णय कसा घेता येइल, त्याची फलित काय? तोटे काय? याचा लेखाजोखा करण.
परिणामकारक संवाद (Effective Communication) आज संवादास विशेष महत्व आहे, आपला मुद्दा, विचार चांगल्या रितीने मांडणेव इतरांना पटवून देणे.
हुशारी बरोबर भावनांचा समतोल साधणे महत्वाचे. जीवघेण्या स्पर्धेमुळे विद्यार्थी प्रचंड तणावा खाली वावरत असतात, या तणावाचा निचरा करता आला पाहिजेआणि विपरीत परिणाम टाळण्याचे कसब यायला हवं.
ह्या सर्वाचा विचार करून टीम कामाला लागली व२६ जूनला आप्पा फुलारे हॉल वाघोली येथे दहावी आणि त्या पुढील विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले, सर्व गावा मधून दहावी नंतरच्या विध्यार्थ्याची यादी बनवली. श्री अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार होते परंतू ठरल्या प्रमाणे घडतच असं नाही याच प्रत्यंतर आल. चाणक्य मंडळाने या वर्षी UPSC झालेले श्री स्वप्निल बावकर उपलब्ध करून दिले.त्यांनी दहावी पासून ते स्पर्धा परीक्षा पर्यंतचा मोठा कॅनव्हास कव्हर केला. वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. आणि करियरच्या वाटा दाखवल्या.
विद्यार्थी मेळाव्यांत, BAMS परीक्षेत महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक व् सुवर्णपदक मिळवणाऱ्या कु. मिनल शंकर नाईक,राणेभाट हिचं कौतुक करण्यात आले. मिनलनी MD CET मध्ये पाचवा क्रमांक पटकावला व् सध्या MD करत आहे.
विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्या सारखा होता. काही विद्यार्थ्यांनी आपले विचार छान पद्धतीने मांडले.