संजीवनी स्वछता अभियान २०१७.

संजीवनी स्वच्छता अभियान २०१७ चे आयोजन भुईगांव समुद्र किनारा व सुरुची बाग येथे २० ऑगस्ट २०१७ सकाळी ८ वाजता करण्यात आले होते. पावसाची संतत धार सुरु असताना सुद्धा विद्यार्थी व तरुणांचा सहभाग उत्साह वाढवणारा होता. एकूण ९० तरुण,तरुणी व विद्यार्थी सहभागी झाले होते. गेली चार वर्ष संजीवनी परिवार २ ऑक्टोबर रोजी मंदिरं व सार्वजनिक ठिकाणी स्वछता करत आहे. यावर्षी पहिल्यादाच समुद्र किनारी स्वछता अभियानचं आयोजन करण्यात आलं, एकंदरीत किनारा, व सुरुची बाग येथील स्वच्छतेचं आव्हान पाहून वर्षाला चार वेळा स्वछता मोहिमेचं आयोजन करण्याचं ठरलं व या ठिकाणी भेटी देणा-या नागरिका मध्ये स्वच्छते विषयी जागरूकता निर्माण करण्याचं ठरलं .
अभियान यशस्वी करण्यासाठी चंपावती देवी मित्र मंडळ व नितीन पाटील यांनी विशेष सहकार्य केलं. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन नी स्वच्छता संदेश असलेल्या कॅप देऊन संजीवनीच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

उपक्रमाची सांगता करताना श्री. कमलाकर पाटील म्हणाले, स्वच्छता अभियान राबवताना निसर्गाची जोपासना करायची आहेच पण वैयक्तिक आयुष्यात स्वच्छता ही जीवन दृष्टि म्हणून अंगी बाणवायचा प्रयत्न करायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी अंगीकारुन पर्यावरणाचा समतोल राखयचा आहे.

सर्वांचे आभार मानुन २ ऑक्टोबरला स्वछता अभियान साठी परत भेटायचं ठरवूनच या अभियानाची सांगता झाली.

 

 

स्वच्छता अभियान ४स्वच्छता अभियान २स्वच्छता अभियान १स्वच्छता अभियान ३