“चला पुस्तकाच्या जगात – वाचन अभियान “
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त अवांतर वाचन करावं, मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत व्हावी, आपली भाषा, संस्कृती ज्ञात व्हावी म्हणून “चला पुस्तकाच्या जगात – वाचन अभियान ” हा उपक्रम.
या उपक्रमात विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले. ५ वी ते ७ वी आणि ८ वी व ९ वी.
टीम संजीवनीने गावागावात जाऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्या त्या गावातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक आठवड्याला भेटून पुस्तक बदलून घेणे अपेक्षित आहे.
अ. क्र. | गाव | सहभागी विद्यार्थी | एकूण |
मुलगे मुली | |||
१) | उमराळे | ६ १४ | २० |
२) | वटार / सोमाडी | ११ ८ | १९ |
३) | वाळूंजे | ११ ४ | १५ |
४) | करमाळे | ७ ५ | १२ |
५) | मर्देस (कोरोटी) | १३ ७ | २० |
६) | मर्देस (नामआळी) | ५ १ | ६ |
७) | गोवारी/गावधनी | ४ १ | ५ |
८) | ओंढाणी/ वैदोडी | ३ ४ | ७ |
९) | भुईगाव | १९ २२ | ४१ |
१०) | पुनाडी/ रबळई | ७ २ | ९ |
११) | बोळींज (पाटील आळी) | ११ ८ | १९ |
१२) | बोळींज (भिरीमआळी) | ७ १० | १७ |
१३) | वाघोली ( पोंडेआळी) | ८ ७ | १५ |
एकूण | ११२ ९३ | २०५ |
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून एक निबंध स्पर्धा घ्यावयाची योजना आहे. पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येईल. निबंध लेखनामुळे विद्यार्थ्यांना वाचनाबरोबरच अभिव्यक्त होण्याची कला शिकण्यास मदत होईल.
शिक्षक / पालक / विद्यार्थ्यांना संजीवनीचं आवाहन : आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी होत असतात. त्या विषयी तक्रारी करत बसण्यापेक्षा आपली पुढील पिढी चांगली घडावी म्हणून कार्यरत होऊ या ! आपणाकडे उपलब्ध असलेला वेळ या अभियानासाठी द्यावा ही कळकळीची विनंती.