संजीवनी वनराईचा सोळावा वाढदिवस संपन्न

‘संजीवनी वनराई’ चा सोळावा, वाढदिवस रविवारी दि ४ जुलै रोजी मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रीमद् शंकराचार्य मंदिर, निर्मळ येथे संपन्न झाला.

प्रा. मुरलीधर सायनेकर यांच्या प्रेरणेने शंकराचार्य मंदिर, निर्मळ परिसरात जुलै २००५ साली संजीवनी परिवाराने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्प सुरू केला.

यावर्षी एमबीबीएस झालेल्या चार डॉक्टर तरुणींना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. डॉ. कु. अनघा देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. इतर तिन्ही डॉक्टर तरुणी प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.

यावेळी उपस्थित असलेले जैमुनी पतसंस्थचे अध्यक्ष राजेश नाईक यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

देशी वृक्षारोपण हे संजीवनी वनराईचे वैशिट्य. यावर्षी मोह ,पांगारा अशा वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

उपस्थितांचे स्वागत किशोर वझे यांनी केले. हेमंत नाईक यांनी प्रास्ताविक व संजीवनीची भूमिका मांडली तर नरेश जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *