संजीवनी परिवार आयोजित वक्तृत्व स्पर्धा २०२२ रविवार, दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी भाऊसाहेब वर्तक विद्या मंदिर, नाळे येथे संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये एकूण १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गटनिहाय उपस्थिती आणि विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
गट क्रमांक १ – ५ वी ते ७ वी – एकूण स्पर्धक ५०
गट क्रमांक १ मधील सहभागी स्पर्धकांची संख्या व त्यातुन निर्माण झालेली चुरस ह्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच क्रमांक १ ते ३ प्रत्येकी दोघांना विभागून देण्यात आले.
प्रथम क्रमांक विभागून- कुमार स्वरूप स्वप्निल पाटील, भुईगाव आणि कुमारी साईशा विकास नाईक, करमाळा
द्वितीय क्रमांक विभागून – कुमारी कनिष्का सुनील पाटील, उमराळे आणि कुमारी ओवि प्रमोद पाटील, उमराळे.
तृतीय क्रमांक विभागून – कुमारी अन्वी रोहन नाईक, वाघोली आणि कुमार हर्ष प्रशांत नाईक, बोळिंज.
उत्तेजनार्थ – कुमारी राशी सचिन म्हात्रे, भुईगाव.
गट क्रमांक २ – ८ वी ते १० वी – एकूण स्पर्धक ३२
प्रथम क्रमांक – कुमारी प्राप्ती दिनेश पाटील, उमराळे.
द्वितीय क्रमांक – कुमारी हितेश्री जितेंद्र पाटील, भुईगाव.
तृतीय क्रमांक – कुमारी धृविका अनिल जोशी, भुईगाव.
उत्तेजनार्थ – कुमारी माही कमळाकर म्हात्रे, भुईगाव.
गट क्रमांक ३ – ११ वी – १२ वी – एकूण स्पर्धक – १३
प्रथम क्रमांक – कुमारी साईली प्रशांत नाईक, बोळिंज
द्वितीय क्रमांक – कुमारी ईशिका जितेंद्र पाटील, माणपे.
तृतीय क्रमांक – कुमारी प्रेरणा प्रफुल्ल पाटील, कणेर
उत्तेजनार्थ – कुमारी साक्षी कुमार जोशी, भुईगाव.
गट क्रमांक ४ – १२ वी पुढील – एकूण स्पर्धक – ११
प्रथम क्रमांक – कुमारी कनिष्का विवेक नाईक, भुईगाव
द्वितीय क्रमांक – कुमारी विशृती प्रदीप म्हात्रे, भुईगाव.
तृतीय क्रमांक – कुमारी मनस्वी विनोद म्हात्रे, भुईगाव.
उत्तेजनार्थ – कुमारी सानिका मोहन पाटील, भुईगाव.
वक्तृत्वस्पर्धेचे उदघाटन सौ. भक्ती वर्तक, नवाळे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संजीवनी परिवाराचे या उपक्रमासाठी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धेस सामोरे जावे असे सांगितले.
स्पर्धेतील प्रत्येक गटाचे परिक्षण प्रत्येकी दोन परिक्षकांनी केले. त्यासाठी विवा महाविद्यालयाच्या पाच शिक्षिका व नँशनल शाळेच्या तीन शिक्षिकांनी सहकार्य केले. सर्व परीक्षकांचे आभार.
स्पर्धा संपल्यानंतर लगेचच झालेल्या बक्षिस सभारंभास श्री. सोमनाथ विभुते, प्राचार्य जी. जी. महाविद्यालय, वसई हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत होते. सहभागी विद्यार्थ्याचे कौतुक करत असताना सरांनी मुलांना अवांतर वाचन आणि विषयाचा सखोल अभ्यास करावा असे सांगितले. सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचा सरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व विजेत्यांचे संजीवनी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.