आमच्याविषयी

  संजीवनी परिवार संस्था 

           संजीवनी परिवार हि वसईतील सामवेदी ब्राह्मण  युवकांनी सुरु केलेली सामाजिक संस्था.  भुईगाव  ते आगाशी  या परिसरात पसरलेल्या बारा गावातील सामवेदी समाज हे संस्थेचे कार्यक्षेत्र. 

          एकेकाळी शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेला समाज आज वेगवेगळी क्षेत्र धुंडाळताना दिसत आहे. सामाजिक ऐक्य व संपन्न सांस्कृतिक परंपरा ही समाजाची बलस्थानं. आधुनिक  काळानुरूप सामाजिक, शैक्षणिक स्थिती  झपाट्यानं बदलत आहे. जागतिकीकरण , बाजारपेठीय अर्थकारण, सर्वच क्षेत्रांत असलेली स्पर्धा, अशा अनेक आव्हानांना  समर्थपणे तोंड देणारे  सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी संजीवनी परिवाराची स्थापना झाली. 

          शैक्षणिक,सामाजिक प्रबोधन,आरोग्य,पर्यावरण आणि उद्योजकता या विषयी समाज अधिक सजग करण्याचा संजीवनी परिवाराचा ध्यास !

 

           शैक्षणिक :  स्पर्धात्मक शिक्षण क्षेत्रात  आपले विद्यार्थी सक्षम व्हावेत म्हणून वेगवेगळ्या विद्यार्थी मार्गदर्शक शिबिराचं आयोजन, वक्तृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धाचं  आयोजन. स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा म्हणून आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान,  वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन अभियान. दहावी , बारावी  व विशेष प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्याचे कौतुक. 

 

          प्रबोधन : सन २००३ पासून संजीवनी व्याख्यानमालेचा प्रारंभ. व्याख्यानमालेअंतर्गत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन. अर्थसाक्षरतेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक कार्यक्रमाचे आयोजन. 

 

         आरोग्य  :  समाजातील गरजू रुग्णासाठी आर्थिक सहकार्य करणारा मेडिकल फंड , आरोग्य विषयक वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन. 

 

         उद्योजकता : समाजातील तरुणांनी  फक्त नोकरी न करता, उद्योग , व्यवसाय करावा, म्हणून  विशेष प्रयत्न, उद्योजकांची शिबिरे , मार्गदर्शक मेळावे , ग्राहकपेठेचं आयोजन. 

 

         पर्यावरण :  निर्मळ श्रीमत शंकराचार्य मंदीर परिसरात श्री सायनेकर सरांच्या प्रेरणेतून आकारलेला  (सन  २००५  पासून)  वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्प , विद्यार्थ्यांच्या सहभागाने श्रमदान , स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम.